‘पार्थ पवार कुकूलं बाळ नाहीत, त्यांनी फ्रॉड केलाय’; अंजली दमानिया यांचा अजित पवार यांच्यावर संताप
मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर संताप.
Anjali Damania’s anger at Ajit Pawar : मुंडवा येथील अमेडीया कंपनीच्या 40 एकर जमीन विक्री प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानी हिला अटक केली आहे. अमेडीया कंपनी ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(DCM Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार(Parth Pawar) यांच्या मालकीची असून पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. पुण्यातील(Pune) जमीन गैरव्यवहार प्रकरणात आता अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या प्रकरणात व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणे आणि चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका घेणे अपेक्षित होतं. अधिकाऱ्यांकडून वेळेत योग्य ती कारवाई झाली असती तर पुढचा प्रकार घडलंच नसता. असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या सगळ्याच खापर आता ते अधिकाऱ्यांवर फोडत आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.
‘पार्थ पवार कुकूलं बाळ नाहीत, त्यांनी फ्रॉड केलाय’; अंजली दमानिया यांचा अजित पवार यांच्यावर संताप @anjali_damania @AjitPawarSpeaks @MumbaiNCP pic.twitter.com/Tu3BQEnS3f
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) December 13, 2025
अंजली दमानिया यांनी अजितपवारांना प्रत्युत्तर देत म्हटलंय की, मला असं वाटतं की लहान मुलं जेव्हा शाळेत जातात, जेव्हा ती कुकूला बाळ असतात, तेव्हा ते मारामारी करतात, तेव्हा असं वाटतं की टीचरने त्यांना थांबवायला हवं होतं, मारामाऱ्या होऊ द्यायला नको होत्या. तसंच काहीस विधान मला अजित पवारांचं वाटत आहे. ‘त्यांचा पार्थ पवार काही कुकूलं बाळ नाही’ आणि त्यांनी जे केली ती चूक नाही, हे फ्रॉड आहे, त्यांनी एकदा नाही तर सगळे डॉक्युमेंट बदलून जे पहिल्यांदा सप्लीमेंट एलएलपी बनवलं, रेसुलेशन पास केलं, खोटा एलओआय घेतला, त्यानंतर एडजुडिकेशन केलं, सेल डिल केलं आणि त्यानंतर पझेशन पर्यंत जर ह्या व्यक्तीने सगळं केलं असेल तर ही काही छोटी मोठी चूक नाही हे फ्रॉड आहे, आणि तो पूर्ण मोठा झालेला तुमचा मुलगा आहे, त्यामुळे याच्यात अधिकाऱ्यांची चूक नाही, जर त्यांना मुलाची चूक दिसत नसेल, तर त्याची दृष्ट काढा आणि त्याला घरात बसवा आम्हाला जे लढायचं आहे ते आम्ही लढणार आहोतच असंही अंजली दमानिया यांनी पुढे म्हटलं आहे. असं यावेळी अंजली दमानिया म्हटल्या आहेत.
